-->
नाझरे धरण 100 टक्यांच्या उंबरठ्यावर, रात्री 11 च्या दरम्यान कऱ्हा नदीत 2000 क्यूसेक्स ने विसर्ग चालू होणार

नाझरे धरण 100 टक्यांच्या उंबरठ्यावर, रात्री 11 च्या दरम्यान कऱ्हा नदीत 2000 क्यूसेक्स ने विसर्ग चालू होणार

जेजुरी -  पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण  100 टक्यांच्या उंबरठ्यावर असून रात्री 11 च्या दरम्यान धरणावरील २६  स्वयंमचलीत दरवाजे  उघडण्याची शक्यता आहे . यामुळे नाझरे धरणातुन अंदाजे 2000 क्युसेस  पाण्याचा  विसर्ग स्वयंचलित दरवाजातून होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नाझरे धरण शाखाधीकारी एस . जी . चौरंग यांनी दिलेला आहे .पुरंदर तालुक्यातील नाझरे  धरणाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट ( पाऊण टीएमसी ) एवढी आहे. आज दि १५ ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता धरण  100  टक्के भरणार आहे . नारायणपूर, सासवड परिसरात मोठा पाऊस होत असल्याने धरण क्षेत्रात  चौदा हजार क्यूसेस  पाणी  येत आहे .  
               नाझरे धरण शाखाधिकारी एस . जी . चौलंग यांनी परीपत्रकाद्वारे  नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी आपले पशुधन तसेच नदी पात्रालगतच्या विद्युत मोटरी  सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आवाहन केले आहे . तसेच नदीपात्रामध्ये रात्री कोणीही न जाण्याचे आवाहन  त्यांनी केलेले आहे. परीपत्रकानंतर  आज याबाबत तरडोली व परिसरातील ग्रामपंचायतीने दवंडीद्वारे  गावच्या सतर्केचा ईशारा दिला  आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article