-->
भीमडी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.जयप्रकाश घुमटकर ; स्वागताध्यक्षपदी भाऊसाहेब फडके तर निमंत्रकपदी वसंतराव साळुंखे !

भीमडी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ.जयप्रकाश घुमटकर ; स्वागताध्यक्षपदी भाऊसाहेब फडके तर निमंत्रकपदी वसंतराव साळुंखे !

राज्यस्तरीय दुसरे संमेलन २७ व २८ मे रोजी चौफुुला येेेेथे होणार !

दौंड प्रतिनिधि ता.१८ जून २०२३
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने चौफुला ( ता.दौंड ) येथे होणा-या दुसऱ्या राज्यस्तरीय भीमथडी मराठी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक डॉ.जयप्रकाश घुमटकर यांची निवड करण्यात आली आहे.स्वागताध्यक्ष पदी भाऊसाहेब फडके यांची तर निमंत्रक पदी वसंतराव साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.

दूसरे राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन दि २७ व २८ मे २०२३ रोजी होणार आहे.संमेलनाच्या संयोजन बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव,राजाभाऊ जगताप,डॉ.भालचंद्र सुपेकर,संमेलनाचे मुख्य संयोजक संजय सोनवणे,दीपक पवार,रवींद्र खोरकर,सुशांत जगताप, बाळासाहेब मुळीक,अरविंद जगताप,रामभाऊ नातू उपस्थित होते. 

भीमथडी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी,जलाभिषेक,उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण,कथाकथन, नाट्यप्रयोग,परिसंवाद,कविसंमेलन व समारोप असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

डॉ.घुमटकर हे ठाणे जिल्हा आणि शहर परिसरात साहित्य,संस्कृती व सामाजिक कार्यात गेली चाळीस वर्षे सक्रीय सहभागी आहेत.जव्हार येथे झालेल्या २५ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले आहे.चित्रपट कसा काढावा?, तऱ्हेवाईक नातेवाईक, विचित्र विश्व,विद्रोही जोतिबा, गोलघुमट-कोळीवाडा ते नौपाडा-एक प्रवास, साहित्य संमेलनाध्यक्ष निवडणूक-लेखाजोखा असे अनेक विविध विषय त्यांनी आपल्या लेखणीद्वारे परखडपणे हाताळले आहे.यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर शोध आणि बोध या प्रबंधाला तर राष्ट्रीय पातळीवरचा दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.बुध्दधम्माच्या वाटेवर या पुस्तकाने तर साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या पुस्तकालाही त्यांना दिल्लीचा सर्वोच्च दलित साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. काव्यक्षेत्रात गोलघुमट या टोपणनावाने ते कविता लेखन करतात. पानगळीची सळसळ, टवाळकी, खिल्ली, पोपटपंची आणि प्रेमासाठी वाट्टेल ते हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.

भाऊसाहेब फडके हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे काम करीत आहेत.दौंड तालुका युवक वर्गात त्यांच्या विषयी आकर्षण आहे.गोरगरीब लोकांना त्यांची नेहमी मदत असते.कानगाव येथील आदर्श विद्यालय शालेय व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष पद व शिवसेना तालुक्याचे सदस्य पद भूषवत आहे.मुलाना शालेय साहित्य वाटप,धार्मिक कार्याची आवड,गोर-गरीबाना मदत अशा कार्यानी कमी वेळात आपली छबी फडके यांनी निर्माण केली आहे.अनेक सामाजिक उपक्रमानी फडके हे नेहमी तालुक्यात अग्रगण्य स्थानावर राहीले आहे.

वसंतराव साळुंखे हे समाजिक व राजकीय कामात नेहमी अग्रेसर असतात.साळुंखे हे सध्या शिवसंग्राम पुणे जिल्हाध्यक्ष पद भूषवत आहे.पाटस टोल प्लाझा हटाव संघर्ष समिती मार्फत त्यांनी अनेक प्रवाशांची व वाहतूकदारांची समस्या दूर केली आहे.वृक्षारोपण,समाजिक कार्यकर्ता म्हणून  
वसंतराव साळुंखे हे सर्वश्रुत आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article